chitika

Sunday, 28 October 2012


    आता तरी

आता मात्र मी तुला पूर्णपणे विसरले आहे
तुझ्या आठवणींना ओरबाडून दूर फेकले आहे
तुझ्या भेटी, तुझी पत्रं, सारं काही जाळलं
माझ्या विचारातलं तुझं असणं जाणीवपूर्वक टाळलं

तू समोर येऊ नयेस म्हणून मी गावच सोडला
आपल्यातला प्रत्येक बंध काळजीपूर्वक तोडला
नव्या मातीत रूजले, नव्या माणसांत रमले
लग्न केलं नाही अजून, बाकी सर्व जमले

पुन्हा पुन्हा पाहीलंय मी अगदी नीट तपासून
मनावरचा तुझा ठसा टाकलाय ना मी पूसुन?
उत्तर "हो" च मिळतं मला, कसे कुणास ठावे
स्वतःशी खरं बोलणं आता तरी शिकायलाच हवे.

No comments:

Post a Comment